असत्य बिंबवणारया कार्याला ’विक्षेप’असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणारया या क्रियेला ’अविद्या’ तर सामूहीक आणि जागतिक पातळीवर चालणारया या क्रियेला ’माया’ असे म्हटले जाते. आणि विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणारया मायेला ’आवरण’ म्हणतात.
’आवरण’ मध्ये वेगवेगळी माणसं आहेत, त्यांची स्वत:ची अशी वेगळी विचार-बैठक आहे. कादंबरीची Protagonist रझिया (जी पुर्वाश्रमीची लक्ष्मी असते. आमीर नावाच्या वर्ग-मित्राबरोबर लग्न केल्यानंतर तिने धर्म बदललेला असतो). तिच्या आयुष्यातला एक कालखंड कोणीतरी लिहून ठेवलेला असावा आणि त्या अनुषंगाने तिच्या परिघात आलेल्या इतरांचाही पंचनामा व्हावा अशा रितीने कादंबरी लिहिली गेलेली आहे. संपूर्ण पुस्तकात ’ हा बघ पुरावा, आहे की नाही सत्य??’ असा रोकडा सवाल आणि जवाब (जर पुरावा असेल तर अर्थात! नाहीतर आक्रस्ताळेपणा) अशा अभिनिवेषातले जाबसाल आहेत.
’आवरण’ची कथा उलगडते कर्नाटकमधल्या हंपीमध्ये. भग्नावषेशांवर डॉक्युमेंटरी करायला आलेली रझिया तिथली भग्न नरसिंहाची मूर्ती पाहून विषण्ण होते. त्या भग्नावषेशांचं कारण वैष्णव-शैव यांच्यामधला वाद सांगीतला गेलेला असला तरी हिंदु संस्कारात वाढलेल्या रझियाला हिंदु लोकांकडून असे कदापिही होणे शक्य नाही याची मनात कुठेतरी खात्री असते, त्यामुळेच काहीतरी चुकत असल्याची जाणीव तिला होते. त्याला पुष्टी मिळते तिच्या स्वर्गवासी वडीलांनी ’इस्लाम’वर केलेल्या अभ्यासाच्या टिपणांनी. त्या वाचनातून बाहेर आलेल्या सत्याने ती हादरुन जाते. ’आवरणा’ची सर्वात प्रथम जाणीव रझियाला तेव्हाच होते. मग झाकोळ दुर झाल्यावर ती आपलं ज्ञान इतरांबरोबर वाटायचा प्रयत्न करते तेव्हा डोळ्यांवर झापडं ओढून बसलेल्या लोकांपर्यंत तिला काय सांगायचेय ते कसं पोहोचत नाही, पोहोचत असलं ते स्वीकारायला नाखूष कसे असतात, त्यातून तिची निर्भत्सनाच कशी होते हे सर्व त्या ’आवरणा’च्या जाणीवेबरोबर आलेले आहे.
’आवरण’ मधली सर्वात प्रभावित करणारी गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे रझियाने देऊ केलेली थोडक्यात भैरप्पांनी पुस्तकाच्या शेवटी दिलेली दिड-एकशे पुस्तकांची संदर्भसूची. ’आवरण’मध्ये रझिया तिच्या पुस्तकावर घालण्यात आलेल्या बंदीनंतर म्हणते, "माझ्या कादंबरीला या सर्व पुस्तकांचा आधार आहे. जर माझ्या पुस्तकांवर बंदी घालायची असेल तर त्याआधी या प्रत्येक ग्रंथावर बंदी घातली पाहिजे." या माणसाचा व्यासंग पाहून चकीत व्हायला झालं आणि त्यांच्याबद्दलचा आदरही दुणावला. त्यांच्या ’पर्व’ बद्दल कुठेतरी वाचलं होतं की ती कादंबरी लिहीण्याच्या आधी सहा-साडेसहा वर्षं ते फ़क्त महाभारतावरच्या पुस्तकांचं वाचन करत होते. ’लई भारी’ म्हणून संदर्भसूची चाळायला लागतो आणि थबकायला होतं...
इथं एक मेख आहे.
सीताराम गोयल- हिंदुत्ववादी लेखक, राम स्वरूप-हिंदुत्ववादी, व्ही.एस.नायपॉल-Anti-Islamic लेखक, अरूण शौरी-इस्लामचे टिकाकार. या सर्वांची पन्नासेक पुस्तकं आहेत.
’आवरण’ मध्ये कुठेतरी भैरप्पा म्हणतात की "ऐतिहासिक सत्याला कुठलाही रंग न देता, थेट त्याच्याकडे बघण्याचा प्रामाणिकपणा हवा". विशिष्ठ वर्गाचा कैवार घेऊन लिहीणारया या सर्व लेखकांच्या लिखाणाचे दाखले देऊन भैरप्पा काय सुचवू पाहतायेत??
अल्बेरूनी, जदुनाथ सरकार, प्रियोळकर, स्टॅनली-पूल ही सर्वसमावेशक नावं संदर्भसूचीकरता आणि पुस्तकात दाखले देताना मात्र सीतराम गोयल बियल प्रभृती असा प्रकार झालाय असं वाटायला लागतं. मागचे पुढचे सर्व संदर्भ वगळून आपल्याला सोयिस्कर तेव्हढीच सत्यं उचलायची आणि काहीतरी सनसनाटी निर्माण करायचं. म्हणजे अंगावर शेकलंच तर "बघा बघा, मी याच पुस्तकातून संदर्भ घेतलाय. माझ्या पुस्तकावर बंदी आणायचिये तर या पुस्तकावर पण आणा" असा कांगावा सहज करता येतो. असं बरेच लेखक करतात. असो, मी ही सर्व पुस्तकं वाचलेली नाहीएत त्यामुळे भैरप्पांच्या लिखाणावर याहून जास्त शंका घ्यायचा मला हक्क पोहचत नाही.
’आवरण’च्या कथेमध्ये आणखी एक समांतर कथाप्रवाह आहे तो म्हणजे मूळ राजपुत असलेल्या पण नंतर खोजा (तृतीयपंथी) बनवल्या गेलेल्या ख्वाजाजहानचा. रझिया ’औरंगजेबाच्या’ काळावर एक कादंबरी लिहीते आहे त्यातले हे मुख्य पात्र. शेवटच्या क्षणी कच खाऊन इस्लाम स्वीकारलेला नंतर समलिंगी संभोग, जबरदस्तीने नपुंसक करणे इ. नी अपमानित केलेला ख्वाजाजहान. रझियाचा मनात चाललेले द्वंद्व, तर्ककुतर्क, भरकटलेपण या ख्वाजाजहानच्या कहाणीत सहीसही प्रतिबिंबीत झालेले आहे. या लिखाणाला तिच्या वडीलांच्या मॄत्यूची पार्श्वभूमी आहे. तिने धर्मांतर केल्याने कायम दुरावलेल्या वडीलांचं आपण क्रियाकर्मही करु शकलो नाही ही खंत तिला खाते आहे. आपण मुळातच धर्म बदलला ते चूक की बरोबर, मग मूळत: ज्या धर्मात होतो तो धर्म आपण आहोत त्या धर्माहून किती सहिष्णू आहे याबद्दल तिला वारंवार येत असलेली प्रचिती, त्यासाठी तिच्या वडीलांनी इस्लामवर केलेल्या गाढया अभ्यासाची टिपणं आदीची मदत होते, मग तिचे होणारे मतपरिवर्तन हे सर्व सर्व ख्वाजाजहानच्या कहाणीतही आहे. म्हणजे थोडक्यात ती कुठेतरी रझियाचीच कहाणी आहे. ख्वाजाजहान आणि एका तपस्व्याची गंगेच्या काठावर पडलेली गाठ आणि त्यांच्यामधला धर्मावरचा संवाद केवळ वाचावा असाच आहे.
छोट्याछोट्या वाक्यातून किंवा प्रतीकांमधून वाचकाला सुन्न करण्याची भैरप्पांची हातोटी विलक्षण आहे. रझिया आणि तिच्या वडीलांमधल्या संवादाची या ३०० पानी पुस्तकात फ़क्त सहा-एक वाक्यं आहेत. त्यातलं एक वाक्य असं आहे- "तू एकटीने आपल्या आयुष्याचं काय करून घेतलंस हा प्रश्न नाही. तुझ्या पोटी जन्मणारं मूल किंवा त्याचं मूल, कुठल्या ना कुठल्या पिढीत आपल्या देवालयाचा नाश करेल. ते पाप तुझ्या डोक्यावर राहील, लक्षात ठेव!"
हे वाचून आपण दुसरया वाक्याकडे वळतो न वळतो तोच त्यातल्या गंभीर शक्यता ध्यानात यायला लागतात आणि आपण गडबडून जातो. मग तो ख्वाजा-जहानच्या Castrationचा प्रसंग. तो इतका भीषण आहे की वाचक "स्स.." केल्याशिवाय राहत नाही. किती लोकांना तृतीयपंथी बनवले गेले, किती स्त्रियांना जनान्याची वाट दाखवण्यात आली, किती हिंदु मंदिरं तोडून मशिदी बनवल्या गेल्या इ. औरंगजेबांच्या जनतेवरच्या अत्याचाराचा लेखाजोखा वाचून आपण मूळ रझियाच्या कहाणीत येतो तेव्हा तिच्याशी इतके समरस झालेलो असतो की राजधानीच्या शहरातल्या एका रस्त्याला या कॄर, असहिष्णु राजाचे नाव दिलेले बघून रझियाबरोबर आपणही उद्विग्न होऊन जातो.
’आवरण’ मधलं एकही पात्र विना-प्रयोजन नाही.
लक्ष्मी उर्फ़ रझिया, तिचा नवरा आमीर-त्याचे कटटर मुसलमान आई-बाप, लक्ष्मीचे वडील, प्रोफ़ेसर शास्त्री (हे पात्र भैरप्पांचे वैचारीक प्रतिस्पर्धी यु.एन.अनंतमुर्तींवर बेतल्याचे म्हटले जाते, त्यावर अनंतमुर्तींनी सडकून टिका केल्याने ’आवरण’वर वाचकांच्या आणखी उडया पडल्या), रझियाचा सौदीमध्ये असलेला कटटर मुसलमान मुलगा नझीर-आजच्या आधुनिक जगातही कटटरपणाची कास पकडून चालणारया मुलांचे प्रतिनिधीत्व करणारा, शास्त्रींचे आई-वडील-मुलगा-सुन-बायको, केंचप्पा आणि इतर सर्व. धर्मांतराच्या मुद्द्यावरून, Post-धर्मांतर परिस्थितीवर रझियाचे बरेच मोनोलॉग्ज आहेत.(इथे मला भैरप्पांनी RSSच्या व्यासपीठावरुन धर्मांतराविरुद्ध चळवळी चालवल्या होत्या त्याची आठवण झाली), टिपू हा प्रत्यक्षात क्रूर राजा आणि कटटर मुसलमान असला तरी त्याला सहिष्णु रंगवण्यात हात असलेल्या लेखकांचा संदर्भ आहे. इथे गिरीश कर्नाडांनी ’टिपु हा आतापर्यंतचा थोर कन्नडीगा आहे’ असे उद्गार काढल्याचा आणि त्यांच्या टिपुवरच्या ’The Dreams of Tipu Sultan’ किंवा ’बळी’या नाटकाचा आणि त्यातून कर्नाडांनी टिपूच्या केलेल्या उदात्तीकरणाचाही अप्रत्यक्ष उल्लेख येतो.. मात्र.. प्रोफ़ेसर शास्त्रींच्या कॅथलिक बायकोने आई-वडीलांच्या मर्जीविरुद्ध शास्त्रींशी लग्न केलेले असताना तिच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तिचा कडवा विरोध का असावा किंवा रझियाचे वडील मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना फ़क्त देवस्थानांच्या विध्वंसांबद्दल आणि मुस्लिम राजांनी ओलीस ठेवुन घेतलेल्या राजपुत्रांबद्दलच टिपणं का काढून ठेवतात याचा उलगडा होत नाही. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला. ह्या छोट्या गोष्टी सोडल्या तर कादंबरी आपल्याला बरयाच ठिकाणी अंतर्मुख करून जाते, विचार करायला भाग पाडते.
ही कादंबरी वाचताना काही वर्षांपूर्वी ’शिक्षणाचे भगवीकरण’ झाले होते त्याची आठवण येणे साहजिक आहे. पाय-उतार झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या सो कॉल्ड मुस्लिमधाजिर्ण्या धोरणाला सणसणीत प्रत्युत्तर म्हणून NDA सरकारने ही खेळी केली होती. पाठ्यपुस्तकं बदलली, मध्ययुगीन काळात( म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या, मोघल काळात थोडक्यात ’मुस्लिम’ कारकिर्दीत) भारताची किती आणि कशी वाताहत झाली (जे तद्दन खोटं आहे असंही मी म्हणणार नाही, पण जे तद्दन खरंही नाहीये) याची रसभरीत वर्णनं घुसडली. पण सुदैवाने त्या सरकाराला पाय-उतार व्हायला लागले आणि आपल्यासकट आपल्या पुढच्या पिढ्यांना adulterated इतिहास वाचावा लागण्याची आफ़त टळली. I wonder, RSSप्रणित ’या’ आवरणावर भैरप्पांनी लिहीलं असतं का?
कोणाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवणं ही शिकवण हिंदु धर्म देत नाही. (मला आठवत असलेले) पुष्यमित्र शुंगाने बौद्ध स्तूपांची तोडफ़ोड केल्याचे उदाहरण वगळता हिंदू राजांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास दिलेला नाही, ना त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवला. उलट त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा होती. हिंदु राजांनी अरब व्यापारयांना मशिदी बांधण्यास परवानगी दिल्याचे( जरी त्यामागे त्यांचा आर्थिक हेतु होता तरी)दाखले इतिहासात आहेत. हा हिंदु धर्माचा मोठेपणा आहे. देवळात जायचं की नाही हे ठरवायचं स्वातंत्र्य हिंदु धर्मातल्या लोकांना आहे, वेळप्रसंगी आपण आपल्या दैवतांची चेष्ठाही करु शकतो. पण.....हिंदु धर्माचे दाखले देऊन इस्लाम कसा क्रूर हे दाखले देण्यात काहीच हशील नाही. प्रत्येक धर्म आपपल्या परीने वेगळा आहे, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबरांनाच ’अल्लाह’ असे म्हटले जाते, मूर्तीपूजा त्यांच्यात वर्ज्य आहे, कुठल्याही ’दार-उल-हरब’(अमुस्लिम) प्रांताला ’दार-उल-इस्लाम’ बनवणे म्हणजे मेल्यानंतर पैगंबरांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही शिकवण त्यांना दिली जाते. काफ़ीर (अमुस्लिम) माणसापुढे दोनच उपाय- मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. मग पुढे दिल्ली सल्तनतीच्या राजांनी मांडवली करून त्यात ’जिझिया’ वगैरे घातला. असं सगळं असताना इथे राज्य करायचं स्वप्न घेऊन आलेल्या या ’गाझी’ लोकांनी त्यांचा धर्म सांगेल ते केलं. ते समर्थनीय मुळीच नाही. कोणाचा धर्म काहीही सांगो, माणसाने माणसांविरुद्ध जे काही केलं ते निंदनीयच आहे. राजेशाहीत, एकाधिकारशाहीत राजवटींकडून जनतेवर बरेच जुलूम होत आले आहेत. त्याला हिंदु राजेही अपवाद नाहीत. वैदीक काळात मनुवाद्यांनी जे केलं ते तिरस्करणीयच आहे. पण हिंदू धर्माने मनुच्या चुकांची जबाबदारी प्रांजळपणे घेऊन त्यत सुधारणा घडवण्याची तयारी दाखवली (असं भैरप्पा म्हणतात) आणि तेच इस्लामकडून अपेक्षित आहे. झाला तो इतिहास आहे. आपण त्याबद्दल ’आज’ काही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्याकडे तटस्थपणे पाहायची वृत्ती जोपासणं, त्यातल्या चुकांमधून धडे मिळवणं अपेक्षित आहे. पण त्याकाळात तू माझी देवळं फ़ोडली म्हणून आज मी तुझ्या मशिदी फ़ोडतो असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याने प्रश्न अजून धगधगत राहणार आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्यांचं समर्थन करण्याची, जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागेल. भैरप्पा म्हणतात, "इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती, आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही." दुर्दैवाने ही गोष्ट आज कोणी ध्यानात घेताना दिसत नाही.
कादंबरीचा रागरंग काहीही असला तरी पण कादंबरीचा शेवट आमीरच्या किंवा लक्ष्मीच्या धर्मांतराने झालेला नाही. परस्पर-सामंजस्य हे सत्यावर टिकून राहतं, दिशाभूल करुन नाही. आपला धर्म अजूनही सनातन आहे, आपल्या धर्मात स्त्रियांना शिक्षण नाही, इतिहासातल्या आपल्या धर्माकडून घडलेल्या चुकांना बेमालूम झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या चुकांची पुनरावृत्ती घडता कामा नये, "आमच्या पुर्वजांच्या चुकांना आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत" हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे , हे आमीरने प्रांजळपणे स्वीकारणं यात भैरप्पांना कादंबरीचा शेवट आशादायक करायचा आहे हे आलंच. आणि इथेच भैरप्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
एखाद्या लहानशा ढगानेमध्ये येऊन अनेक योजने विस्तार असलेल्या सूर्यमंडळाला दृष्टीआड करावं , त्याप्रमाणे आवरण शक्ती सत्याला झाकोळून टाकते.
’आवरण’ वाचून आपल्या बुद्धी-विचारांवरची झापडं काही प्रमाणात दूर झाली आणि आपण असत्यापासून मुक्त होऊ शकलो तर ते ’आवरण’चे आणि पर्यायाने ’एस.एल.भैरप्पा’सारख्या सिद्दहस्त लेखकाचे यश मानले जाईल.
’आवरण’ मधलं एकही पात्र विना-प्रयोजन नाही.
लक्ष्मी उर्फ़ रझिया, तिचा नवरा आमीर-त्याचे कटटर मुसलमान आई-बाप, लक्ष्मीचे वडील, प्रोफ़ेसर शास्त्री (हे पात्र भैरप्पांचे वैचारीक प्रतिस्पर्धी यु.एन.अनंतमुर्तींवर बेतल्याचे म्हटले जाते, त्यावर अनंतमुर्तींनी सडकून टिका केल्याने ’आवरण’वर वाचकांच्या आणखी उडया पडल्या), रझियाचा सौदीमध्ये असलेला कटटर मुसलमान मुलगा नझीर-आजच्या आधुनिक जगातही कटटरपणाची कास पकडून चालणारया मुलांचे प्रतिनिधीत्व करणारा, शास्त्रींचे आई-वडील-मुलगा-सुन-बायको, केंचप्पा आणि इतर सर्व. धर्मांतराच्या मुद्द्यावरून, Post-धर्मांतर परिस्थितीवर रझियाचे बरेच मोनोलॉग्ज आहेत.(इथे मला भैरप्पांनी RSSच्या व्यासपीठावरुन धर्मांतराविरुद्ध चळवळी चालवल्या होत्या त्याची आठवण झाली), टिपू हा प्रत्यक्षात क्रूर राजा आणि कटटर मुसलमान असला तरी त्याला सहिष्णु रंगवण्यात हात असलेल्या लेखकांचा संदर्भ आहे. इथे गिरीश कर्नाडांनी ’टिपु हा आतापर्यंतचा थोर कन्नडीगा आहे’ असे उद्गार काढल्याचा आणि त्यांच्या टिपुवरच्या ’The Dreams of Tipu Sultan’ किंवा ’बळी’या नाटकाचा आणि त्यातून कर्नाडांनी टिपूच्या केलेल्या उदात्तीकरणाचाही अप्रत्यक्ष उल्लेख येतो.. मात्र.. प्रोफ़ेसर शास्त्रींच्या कॅथलिक बायकोने आई-वडीलांच्या मर्जीविरुद्ध शास्त्रींशी लग्न केलेले असताना तिच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाहाला तिचा कडवा विरोध का असावा किंवा रझियाचे वडील मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास करताना फ़क्त देवस्थानांच्या विध्वंसांबद्दल आणि मुस्लिम राजांनी ओलीस ठेवुन घेतलेल्या राजपुत्रांबद्दलच टिपणं का काढून ठेवतात याचा उलगडा होत नाही. आपल्या सोयीची तेव्हढी सत्यं इतिहासातून उचलण्याचा आणखी एक प्रकार इथे जाणवला. ह्या छोट्या गोष्टी सोडल्या तर कादंबरी आपल्याला बरयाच ठिकाणी अंतर्मुख करून जाते, विचार करायला भाग पाडते.
ही कादंबरी वाचताना काही वर्षांपूर्वी ’शिक्षणाचे भगवीकरण’ झाले होते त्याची आठवण येणे साहजिक आहे. पाय-उतार झालेल्या कॉंग्रेस सरकारच्या सो कॉल्ड मुस्लिमधाजिर्ण्या धोरणाला सणसणीत प्रत्युत्तर म्हणून NDA सरकारने ही खेळी केली होती. पाठ्यपुस्तकं बदलली, मध्ययुगीन काळात( म्हणजे दिल्ली सल्तनतीच्या, मोघल काळात थोडक्यात ’मुस्लिम’ कारकिर्दीत) भारताची किती आणि कशी वाताहत झाली (जे तद्दन खोटं आहे असंही मी म्हणणार नाही, पण जे तद्दन खरंही नाहीये) याची रसभरीत वर्णनं घुसडली. पण सुदैवाने त्या सरकाराला पाय-उतार व्हायला लागले आणि आपल्यासकट आपल्या पुढच्या पिढ्यांना adulterated इतिहास वाचावा लागण्याची आफ़त टळली. I wonder, RSSप्रणित ’या’ आवरणावर भैरप्पांनी लिहीलं असतं का?
कोणाच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवणं ही शिकवण हिंदु धर्म देत नाही. (मला आठवत असलेले) पुष्यमित्र शुंगाने बौद्ध स्तूपांची तोडफ़ोड केल्याचे उदाहरण वगळता हिंदू राजांनी इतर धर्माच्या लोकांना त्रास दिलेला नाही, ना त्यांच्या श्रद्धास्थानांना धक्का पोहोचवला. उलट त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचं आचरण करण्याची मुभा होती. हिंदु राजांनी अरब व्यापारयांना मशिदी बांधण्यास परवानगी दिल्याचे( जरी त्यामागे त्यांचा आर्थिक हेतु होता तरी)दाखले इतिहासात आहेत. हा हिंदु धर्माचा मोठेपणा आहे. देवळात जायचं की नाही हे ठरवायचं स्वातंत्र्य हिंदु धर्मातल्या लोकांना आहे, वेळप्रसंगी आपण आपल्या दैवतांची चेष्ठाही करु शकतो. पण.....हिंदु धर्माचे दाखले देऊन इस्लाम कसा क्रूर हे दाखले देण्यात काहीच हशील नाही. प्रत्येक धर्म आपपल्या परीने वेगळा आहे, प्रत्येक धर्माची शिकवण वेगळी आहे. इस्लाममध्ये महंमद पैगंबरांनाच ’अल्लाह’ असे म्हटले जाते, मूर्तीपूजा त्यांच्यात वर्ज्य आहे, कुठल्याही ’दार-उल-हरब’(अमुस्लिम) प्रांताला ’दार-उल-इस्लाम’ बनवणे म्हणजे मेल्यानंतर पैगंबरांच्या मांडीला मांडी लावून बसणे ही शिकवण त्यांना दिली जाते. काफ़ीर (अमुस्लिम) माणसापुढे दोनच उपाय- मृत्यू किंवा इस्लामचा स्वीकार. मग पुढे दिल्ली सल्तनतीच्या राजांनी मांडवली करून त्यात ’जिझिया’ वगैरे घातला. असं सगळं असताना इथे राज्य करायचं स्वप्न घेऊन आलेल्या या ’गाझी’ लोकांनी त्यांचा धर्म सांगेल ते केलं. ते समर्थनीय मुळीच नाही. कोणाचा धर्म काहीही सांगो, माणसाने माणसांविरुद्ध जे काही केलं ते निंदनीयच आहे. राजेशाहीत, एकाधिकारशाहीत राजवटींकडून जनतेवर बरेच जुलूम होत आले आहेत. त्याला हिंदु राजेही अपवाद नाहीत. वैदीक काळात मनुवाद्यांनी जे केलं ते तिरस्करणीयच आहे. पण हिंदू धर्माने मनुच्या चुकांची जबाबदारी प्रांजळपणे घेऊन त्यत सुधारणा घडवण्याची तयारी दाखवली (असं भैरप्पा म्हणतात) आणि तेच इस्लामकडून अपेक्षित आहे. झाला तो इतिहास आहे. आपण त्याबद्दल ’आज’ काही करु शकत नाही. आणि म्हणूनच त्याच्याकडे तटस्थपणे पाहायची वृत्ती जोपासणं, त्यातल्या चुकांमधून धडे मिळवणं अपेक्षित आहे. पण त्याकाळात तू माझी देवळं फ़ोडली म्हणून आज मी तुझ्या मशिदी फ़ोडतो असं बोलण्यात काहीच अर्थ नाही. त्याने प्रश्न अजून धगधगत राहणार आणि चुकांमधून शिकण्यापेक्षा त्यांचं समर्थन करण्याची, जबाबदारी टाळण्याची वृत्ती वाढीस लागेल. भैरप्पा म्हणतात, "इतिहासाकडून मिळवण्याइतकंच, त्याच्याकडून सोडवून घेणं हे परिपक्वतेचं द्योतक आहे. प्रत्येक धर्म, जाती, आणि व्यक्तीला लागू पडणारी गोष्ट आहे ही." दुर्दैवाने ही गोष्ट आज कोणी ध्यानात घेताना दिसत नाही.
कादंबरीचा रागरंग काहीही असला तरी पण कादंबरीचा शेवट आमीरच्या किंवा लक्ष्मीच्या धर्मांतराने झालेला नाही. परस्पर-सामंजस्य हे सत्यावर टिकून राहतं, दिशाभूल करुन नाही. आपला धर्म अजूनही सनातन आहे, आपल्या धर्मात स्त्रियांना शिक्षण नाही, इतिहासातल्या आपल्या धर्माकडून घडलेल्या चुकांना बेमालूम झाकून टाकण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या चुकांची पुनरावृत्ती घडता कामा नये, "आमच्या पुर्वजांच्या चुकांना आम्ही जबाबदार नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत" हे सिद्ध करण्याची जबाबदारी आपली आहे , हे आमीरने प्रांजळपणे स्वीकारणं यात भैरप्पांना कादंबरीचा शेवट आशादायक करायचा आहे हे आलंच. आणि इथेच भैरप्पा इतरांपेक्षा वेगळे ठरतात.
"आवरण शक्तिस्तावदल्पोsपि मेघोsनेकयोजनायत्मादित्यमंडलमवलोकयितृ नयनपथपिधायकतया्सच्छादयतीव..."
एखाद्या लहानशा ढगानेमध्ये येऊन अनेक योजने विस्तार असलेल्या सूर्यमंडळाला दृष्टीआड करावं , त्याप्रमाणे आवरण शक्ती सत्याला झाकोळून टाकते.
’आवरण’ वाचून आपल्या बुद्धी-विचारांवरची झापडं काही प्रमाणात दूर झाली आणि आपण असत्यापासून मुक्त होऊ शकलो तर ते ’आवरण’चे आणि पर्यायाने ’एस.एल.भैरप्पा’सारख्या सिद्दहस्त लेखकाचे यश मानले जाईल.
17 comments:
मीपण नुकतंच हे पुस्तक वाचलं. मला भैरप्पा आवडतात. त्यांचं आत्मचरित्र तर खासच होतं. पण हे पुस्तक मला नाही आवडलं.
त्यांचं ’पर्व’ही मला नव्हतं आवडलं. महाकाव्यांना आपल्या काळाच्या चष्म्यातून पाहायचा आणि वास्तवाची बेंगरूळ वस्त्रं चढवणारा प्रयत्न वाटला होता तो. त्याच जातीचा प्रयत्न वाटला मला हा. इतिहासाचा विस्तीर्ण पट कुण्या आंधळ्यानं चाचपून पाहावा आणि आपली ’निरीक्षणं’ अंतिम सत्य म्हणून समोर ठेवावीत तसा.
त्यांचे निष्कर्ष बरोबर असतीलही. ते तार्किक दृष्ट्य़ाही पटणारे आहेत. सत्याचा अपलाप करणारे समाज विनाशाच्या उंबरठ्यावर जातात, ठीक. पण या सत्याचं दर्शन घडवणारी कलाकृती म्हणून कादंबरी अगदीच पोकळ आहे.
तू ज्या लहान सहान खटकणार्या गोष्टींचा उल्लेख केला आहेस, त्या लहानसहान नसून मलातरी गोष्टीला खोटं ठरवणार्या, सोईस्कर आणि म्हणून पुस्तकाच्याच आशयाला मारक वाटल्या. जर भैरप्पा इतरांवर सत्यावर आवरण घातल्याचा आरोप करत असतील, तर अशा तकलादू, एकांगी संशोधकाच्या चित्रातून ते कोणता निष्पक्षपाती निष्कर्ष समोर ठेवू पाहताहेत?
परिकथांमधे रमण्याच्या वयातून बाहेर आलेल्यांना पर्व आवडली नाही असे पाहण्यात आले नव्हते. वास्तव हे वास्तव आहे, ते बेंगरूळ असेल तर त्याला इलाज नाही. चांगले दिसत नाही म्हणून सत्य नाकारता येत नाही. भैरप्पांना आन्धळे म्हणण्यापुर्वी आपल्या दिव्यचक्षुंची काही प्रचिती दिली असतीत तर बरे झाले असते. भैरप्पांचे लिखाण एकांगी आहे असा आरोप करताना दुसरे अंग काय आहे हे पुराव्यासहीत सांगु शकलात तरच तुमच्या आरोपात काही तथ्य जाणवेल. नाहीतर तुम्ही या कादंबरीतल्या काही खल-पात्रांपैकी एक असाव्यात असे मानावे लागेल. तुमचे पूर्वग्रह टिकवायला या कादंबरीने त्रास होत असल्यास ते पूर्वग्रह चुकीचे असण्याची शक्यता एकदा ताडून पहा हि विनंती.
@kishorkumarganguly
मी या कादंबरीतल्या खलपात्रांपैकी एक आहे, असे मानलेत तरी चालेल. :)
@मेघना
मी खटकणारया गोष्टी ’छोट्या’ आहेत असं म्हटलं आहे कारण त्यात खूपच ’कदाचित’ आहेत. ’कदाचित’ रझियांच्या वडीलांनी समग्र अभ्यास केला असेल आणि रझियानेही ; पण संदर्भ देताना फ़क्त आवश्यक तेवढ्या टिपणांचाच दिला गेला असेल.
शास्त्रींच्या बायकोने लग्न केल्यानंतर धर्म बदलला नाही पण आपला धर्म कायम ठेवणं अरुणाला मुस्लिम लग्न करून शक्य होणार नाही असं तिला वाटलं असावं ’कदाचित’(आणि जे खरं आहे). यात ’आवरण’ नाही, थेट काही न लिहीता गोष्टींकडे बोट दाखवण्याचा बेमालूमपणा असेल लिखाणातला फ़ार फ़ार तर.
आपण जो चष्मा चढवून वाचू ना गं, तसंच आपल्याला कॅरेक्टर जाणवायला लागतं.
आपण कादंबरीकाराला असा बेमालूमपणा आणि चलाखी करण्याची एव्हढी स्पेस दिली पाहिजे असं मला वाटतं.कादंबरीकाराने आपल्या वाचकाकडून एव्हढंस काहीतरी expect करणं म्हणजे फ़ार नाही..ते भैरप्पा द ग्रेट असले तरी. :)))
आणि त्यांनी सांगीतलेली एखादीही गोष्ट खोटी नाहीये हे ही तेव्हढंच खरं. फ़क्त ती खूपच ’inconvenient' आणि भडकाऊ सत्य आहेत.
नाही, भैरप्पा म्हणताहेत ते सगळं खरं असेल. फक्त त्यांच्या कादंबरीतून ते तितक्या कन्व्हिंसिंगली येत नाही, निदान माझ्यासाठी. म्हणजे - स्त्रीवाद ही योग्य आणि मी ज्या गोष्टीला किंमत देते अशी गोष्ट. पण ती 'अवंतिका' किंवा तत्सम टीव्ही सिरियली बायकांच्या तोंडून आली की मला उलटा संताप येतो. त्यासारखं.
मला सांगता आलंय का नीट मला काय म्हणायचंय ते? कुणास ठाऊक.
@मेघना,
आपण ’आपल्या’ व्याख्या सगळ्यात शोधायला लागलो तर काहीच कन्व्हिसिंग वाटणार नाही. ’स्त्रीवाद’ (स्त्रीवाद का म्हणतो आपण?? ते ’दहशतवादा’सारखं वाटतं) ’स्त्रीवाद’च असतो. फ़क्त ते दाखवण्याचा मार्ग , त्याची व्याप्ती बदलते. आपल्याला हवे असलेले सगळेच कंगोरे त्यात कसे मिळणार?? थोडे-फ़ार असतात इथे-तिथे. शोधायचे आपण. तुला काय कंन्व्हिंसिंग नाही वाटलं exactly??? Feminism हा भैरप्पांचा फ़ॉटे आहे असं म्हटलं जातं. पण मला ’आवरण’ मध्ये”’प्रेषित’ पुरुषच का??स्त्री का असू शकत नाही??’ हा वाद वगळता स्त्रीवाद नावालाही दिसत नाही. Individualism दिसला. तू ’स्त्रीवाद’ शोधत होतीस का???
BTW, तुला माहीतेय का? त्यांची ’कवलु’ feminism वर आहे. Would be treat for you. मी अनुवाद होण्याची वाट बघतेय.
मी जे काही म्हणायचा प्रयत्न करतेय, ते कम्प्लीट गंडतंय. :(
जाऊ दे, मी स्त्रीवादाचं (!) उदाहरण देत होते फक्त. योग्य विचार अयोग्य पद्धतीनं मांडला गेला की योग्य असूनही खटकतो, असं काहीसं मला म्हणायचं होतं (जे या कादंबरीच्या बाबतीत मला वाटलं. सेक्युलर आवरणं दाखवताना भैरप्पांनी सोईस्कर भगवी आवरणं तर नाही ना घेतलेली, अशी शंका या कादंबरीबद्दल यावी, हेच त्यांचं अपयश वाटलं...).
पण ते एक असो...
मेघना, श्रद्धा, किशोरकुमार गांगुली-
मी हे पुस्तक वाचलेले नाही. मला भैरप्पा कोण हे ही आता ह्या क्षणापर्यंत माहीत नव्ह्तं पण तुमच्यातली चर्चा वाचून वाचावंसं वाटतंय. तुम्ही जे म्हणताय ते सगळंच कळलंय असं नाही पण पुस्तक वाचून कळून घ्यायचा प्रयत्न करीन.
Shraddha / Meghna, tumchyapaike konakade hi pustk aahet kaay? aslyaas vachyla havi hotee.
दीप
माझ्याकडे पुस्तक आहे. पण तुला मी देणार , मग तू वाचणार यापेक्षा तू नक्की कुठे आहेस ते सांगीतलंस तर हे पुस्तक कुठे मिळेल याबद्दलची शुअर टीप देऊ शकेन.
बघ.
मी डोंबिवलीत राहातो. तू कुठायस सध्या? दिल्ली ? आधी वाचूनच मग ते विकत घेईन म्हणतोय... तुझा ई मेल आय डी ही दे जमल्यास. दोन्ही पुस्तकं.
comment madhye lihitana ghol zaalaay haha aso donhee pustk aadhee vachun nntarch vikt ghein as mhnaaych hote.
दीप माझा आय.डी bhowad.shraddha@gmail.com
thanks for the mail id :) added u on G-talk
hey really nice i lv it
http://disamajikahitari.wordpress.com/2013/06/09/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/
Post a Comment