अपरिहार्य कारणास्तव...

२९ तारखेला वर्ग सुरु करण्याआधी सर एकच वाक्य बोलले...
"तुम्ही पास होणं किती गरजेचं आहे हे तुम्हाला एव्हाना कळलं असेल.."
यु.पी.एस.सी च्या तयारी वर्गातली आम्ही पन्नास एक मुलं-मुली सुन्न बसलो होतो...
करकरे सर, कामते सर यांच्या मृत्युच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलेलो नव्हतो..
आपल्याला पोस्ट मिळाल्यावर आपल्यापुढे काय वाढून ठेवले आहे याचाच विचार त्या वर्गातला बहुधा प्रत्येकजण करत होता..
’टॉक लेस..ऍक्ट मोअर’ हे ब्रीदवाक्य असणारे आम्ही २ मिनीटे श्रद्धांजली वाहून अभ्यासाला सुरुवात करतो...
जे घडतंय त्याला आपण बदलवू शकत नसू तर त्याबाबतीत वाचाळायची काहीही गरज नाही...हा घालून दिलेला नियम आम्ही तंतोतंत पाळतो..
पण त्याने विचार करणं थोडीच बंद होतं...???
काही उमटणं थोडीच कमी होतं..??
गेलेली माणसं परत थोडीच येतात..???
मनाचा धडा करून कणकण मरत जगणं थोडीच कमी होतं???
लॉलीपॉप सारखी हातात एके-४७ नाचवत एक भिकारचोट कसाब येतो...बंदुकीची एक अंदाधुंद फ़ैर झाडतो...एक बुलेट आपल्या दिशेने येते...बास्स...
जस्ट लाईक दॅट..काही सेकंदाचा अवधी आणि ब्लॅक-आऊट..
आपणही त्या जागी असलो असतो या विचाराने मन थरकापतं..
मरण इतकं स्वस्त असतं..???
विचाराने भोवंडायला होतं, आणि मग कोणालातरी विचारलं जातं...
हे असं का???त्यांच्याबाबतीतच का???
याच्यावर मला त्याहून होपलेस उत्तरं मिळतात..
"आपल्या हातात काय आहे...आपण काय करणार त्याला??"
"झालं ते घडून गेलं..त्यांची वेळ आली होती असं समजायचं आणि यापुढे सजग राहायचं"
"शो मस्ट गो ऑन"
म्हणजे हे सगळं असंच घडायचं होतं...त्या लोकांना जायचंच होतं..??
आपली वेळ आली नव्हती बहुधा..म्हणून वाचलो..
किती सोयिस्कर स्पष्टीकरण...! का मनाची घातलेली समजूत???
मग त्या कर्त्याकरवित्याला अशीच मेहेरनजर ठेवायला सांगून पुढच्याच क्षणापासून निर्विकार होऊन जीवन कंठायचं...
हे इतकं सोप्पं असतं???
नियतीनुसार असंच घडणार होतं तर नियती,प्राक्तन वगैरे वर विश्वास ठेवणारयांना असं नाही वाटलं के नियती जरा जास्तच पार्शालिटी करतेय??
एका धक्क्यातून सावरतो नाही आहोत तर कुचकटपणे दुसरा धक्का देतेय..??
असे आणखी किती धक्के पचवायचे आहेत कुणास ठाऊक??
आणि असं काही घडलं की मग ज्वलंत वगैरे कवितांना अगदी सुगीचे दिवस येतात..
याच काळात मी एका ब्लॉगवर अकलेचे तारे तोडलेले पाहिले...
लेखक म्हणतो.."बरं झालं...हेमंत करकरेंना गोळी लागली...त्यामुळे आता पोलिसांना अद्ययावत बुलेट्प्रुफ़ जॅकेट्स मिळतील.."
मला अगदीच मान्य आहे की लेखकाने ते भावनेच्या भरात लिहीलं होतं पण इतकं बेजबाबदार विधान करण्याचा आपल्याला कितीसा हक्क पोहोचतो???
आपण फ़ील्ड वर होतो..??? नाही...
अतिरेक्यांशी आपण लढलो??? नाही...
पुरेसं संरक्षणही नसताना आतल्या ओलिसांसाठी स्वत:चे कुटुंब, आयुष्य ऐरणीवर ठेवून आपण जीवाची बाजी लावली?? नाही...
आपण टॅक्स भरला किंवा ह्या देशाचा नागरीक असल्याची किमान कर्तव्ये केली की वाट्टेल ते बडबडायचा अधिकार मिळतो की काय कोण जाणे???
हा काय कुठला यज्ञ वगैरे आहे का???आधी बळी द्या मग मी तुम्हाला बुलेटप्रूफ़ जॅकेट्स देतो..
आणि त्या होमकुंडात मग करकरे सर, कामते सरांसारख्या ऑफ़िसर्सचा बळी द्यायचा...
आणि आपण काय करतो???फ़क्त चर्चा करतो..
चर्चा करून तोंड दुखले की चॅनेलवरच्या लाईव्ह टेलिकास्टला मुंगळ्यासारखे चिकटून बसतो..
आणि याबाबत छेडले की म्हणतो.."आपण काय करणार?"
आपण ज्या सिस्टीमला कोसतोय...जिच्या नावाने आता ठो ठो बोंबलतोय..त्या सिस्टीमचा एक भाग होऊन बदल घडवून आणायची किती लोकांची तयारी आहे???
पोलिसांना बुलेटप्रूफ़ जॅकेटसही न पुरवता त्यांना एके-४७चा सामना करायला लावणारया मठ्ठ, कोडग्या सरकारला धडा कोण शिकवणारेय??
भ्रष्ट, किडलेल्या नोकरशाहीला बदलवण्याची जबाबदारी कोणाची??
अर्थातच आपली...
जनतेची..तरुण आणि तरुणींची...
पण आपण ते करणार नाही...
आपल्याला काय ..छोटीशी गाजरंही पुरेशी असतात...
कालच पेट्रोल आणि डीझेल चे भाव कमी केले...पुढल्या दोन महिन्यात सोयी-सुविधांचा पाऊस पडेल...मग आपण त्यापायी २६/११, लोकल बॉम्बिंग सगळं सगळं विसरून जाऊ..
आपण कसं मरावं हे सरकार ठरवत आलं होतं आणि यापुढेही सरकारच ठरवेल..
एखाद्या वेश्येला गिर्हाईकाने नुसता हात लावायचा का आणखी काय करायचं हे तिचा दलाल ठरवतो ना...अगदी तसंच..
जुलैच्या बॉंम्बस्फ़ोटांमध्ये दोन दिवस डोळ्याचं पाणी खळलं नव्हतं..
खैरलांजीचा एफ़.आय.आर वाचताना कानात दडे बसले होते...हातापायांना कंप सुटला होता..
नुसतं काहीतरी वाटतं आपल्याला...दोन टिपं गाळतो आपण.. चुकचुकतो.. हळहळतो..मग तीच कहाणी मागच्या पानावरून पुढे चालू...
पण..
जे घडलं ते पुन्हा घडू नये याची खबरदारी घेण्यास आपण लायक आहोत का??हे पहावं आधी..
नसलो तर या परिस्थितीत कशाही आणि कोणत्याही प्रकारे बदल घडवण्याची ताकद प्रथम आपल्यात निर्माण करावी..
पण नुसतं संवेदनशील होऊन काय फ़ायदा???
आणि प्लीज..
झाले खुट्ट की केली कविता...झालं खुट्ट की लिहिलं झणझणीत...असं केलं की आपण भारी संवेदनशील असं वाटतं का लोकांना..???
बरं..आपल्याच्याने काही होत नसेल तर जे करतायेत त्यांनातरी ते करू द्यावं...
ताज आणि ओबेरॉयच्या परिसरात फ़ायरींग चालू असताना लोक पिक्चरचं शूटींग पाहायला जमावीत तशी जमली होती...हॉटेल मधून एखादी फ़ैर झाडली गेली की मूर्खासारखी खिदळत आणि टाळ्या वाजवत होती..
कसाबचा एखादा भाऊ तिकडे टपकला असता तर किती कॅजुअल्टी झाली असती हे या बिनडोक लोकांना का कळत नाही???
जिकडे जमायला नको तिकडे ही माणसे बरोबर जमतात...
जमली तर जमली..जे करायला नको ते करतात...
मग अशा मूर्ख लोकांचे फ़ोटो घेऊन त्या फ़ोटोच्या ढुंगणाखाली ’मुंबईकरांचे स्पिरीट’ लिहून वर्तमानपत्रे आपला खप वाढवतात..
निष्कर्ष काय???फ़क्त नोकरशाही आणि सरकारच नाही...तर लोकांची कोडगी मानसिकताही बदलवण्याची गरज आहे..
अशा मूर्ख लोकांवर राज्य करणं राज्यकर्त्यांच्या हातचा मळ का नाही असणार???
हे खूप फ़िल्मीस्टिक वाटेल...पण ’रंग दे बसंती’ मध्ये नेमक्या प्रश्नावर बोट ठेवलं गेलं होतं..
करण, अस्लम च्या पात्रांमधून "जिस दिन ग्रॅज्युएशन हुआ..मै तो कट लूंगा अमेरिका...मेरा यहा कुछ होनेवाला नही.." म्हणणारया आजच्या तरूण पिढीची मानसिकता दाखवली गेली होती..
"कोई भी देश बेहतर नहीं होता...उसे बेहतर बनाना पडता है" म्हणणारा फ़्लाईट लेफ़्टनंट अजय असाच एक आशेचा किरण..
आपल्या सुरक्षित जगांमध्ये राहून ..एखाद्या गोष्टीवर लिहून अथवा बोलून बदल घडवता येतो हा समज साफ़ चुकीचा आहे..
आणि बदल घडवण्याची जिद्द न बाळगणं हा अक्षम्य गुन्हा...!!
(टाईमपास साठी जे पब्लिक अशा विषयांना हात घालतं त्यांनी माफ़ करावं..ही ऊरस्फ़ोड तुमच्याकरता नाही..)
२६ ला जे काही झालं त्यावर लिहायचं नाही...कितीही वाटलं तरी...हे ठरवलं होतं...आतपर्यंत पाळलंही..
पण आज माझ्याच मागच्या पोस्टस वाचताना मला खूप थिल्लर..चीप वाटायला लागले...
मी...माझ्याभोवती विणून घेतलेले एक जग...माझी ध्येयं...माझा अभ्यास...’प्रिय’...किती कोझी...किती उबदार..!!
हे जपलेलं जग किती सहज तडकणारं आहे याची जाणीव झाली..
ह्या विषयावर आतापर्यंत लिहिल्या/वाचल्या गेलेल्या काही अपरिपक्व लिखाणाने संताप संताप झाला..
म्हणून..

11 comments:

कोहम said...

jyavirodhat tu lihiteys tech swataha karateys asa mala vaTala. No offence...halakech ghe..

Shraddha Bhowad said...

निश्चितच..!
मी ’ब्लॉगवर बेजबाबदार विधाने करणे’ आणि ’सडलेली मुलकी नोकरशाही’ या दोन गोष्टींविरुद्ध लिहिलंय..
यापैकी कुठली गोष्ट मी करतेय असं तुम्हाला वाटलं?

यशोधरा said...

>>झाले खुट्ट की केली कविता...झालं खुट्ट की >>लिहिलं झणझणीत...असं केलं की आपण भारी >>संवेदनशील असं वाटतं का लोकांना..???

अगदी! अगदी सगळेच असे नसले तरी काहीजण असतातच. कटाक्षाने या विषयावर लिहिणं मी टाळलंय. लोकांनी तर काल्पनिक कथा लिहिल्यात अतिरेक्याच्या मनातले विचार वगैरे... :(
हसावं, रडावं की संतापावं तेच कळत नाही...असो..

आश्लेषा said...

zalelya goshtivar lihun mokaLe zalo ki apala kartavya sampala. mag apaN apapalya jagat ramayala mokaLe ..mhaNaje sensitive asalyasarakha paN waTata aNi swatala kahi kashTa paN karave lagat nahit..rastyavarachya lahan bhikari mulanna bhik ghatali ki zala, tyanchyasaThi ajun changala aNi useful kahi kela pahije he jaNiv mag zaTakun Takata yete tasach aahe he..

Harshada Vinaya said...

huge sigh...........

Arti said...

Hello Shraddha,
Nehami lihit ja.. MAla tuze kahihi chukich nahi vatat.. Lekhan he manatil/ mendutil udvigna vichar baher kadhanyache sadhan aahe. Aapan lihilele anaekani vachale tar tyanahi halak vatate.
Aani yogya marga lavkar suchatat. Je khara khara lihun halake hotat tech mothi kam kari shakatat..!

Keep writing...
Arti

Samved said...

!!!!

सुजित बालवडकर said...

छान लिहिलयस. स्वतःसाठी लिहितेस असं वाटतं. अशीच लिहित रहा.

सुजित

Unknown said...

Jo tu nirnay ghetla hotas, kahihi yavar bhashya na karnyacha. To yogyach hota. Kahi lihun charcha karun farse kai ghadat nai. Kay karayche, kase karyche, matdan karyche ka nai?? aani konala?? he fact aapan swatahashi tharvyche aani karun mokle hoyche.. Je kahi changle vhave aashi iccha aahe, tyachi survat swatahpasun kar.. aata tula lagech result milnar nai.. pan nantar nishtich milel.. mahntat na, APAN KOY LAVAVI..TYALKA KHAT PANI GHALAVE, TYA ZADALA YENARE MADHUR AAMBE APLE NATU,PANTU CHAKHTIL.....

Dk said...

.




Life is not a matter of having good cards, but of playing a poor hand well.

Nil Arte said...

टेंगशेंच्या स्वप्नात ट्रेन !!! अजून काय लिहू

 
Designed by Lena